दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या
धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये
लोकनेते साहेबांना मोलाची साथ दिली.पडत्या काळामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा
परिवार सांभाळण्याचे काम केले. आज जे वैभव दिसत आहे ते ते कै.सौ.ताईसाहेब यांचे आशिर्वादामुळेच
असून त्यांचे कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी त्यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्यसाधून
कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांच्या नावाने पाटण तालुक्यातील गोर-गरीबा कुटुंबातील
विद्यार्थीनींना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी या संकल्पनेतून शिष्यवृत्ती देण्याचा
चांगला निर्णय घेतला असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनींनी या पुढील काळामध्ये चांगले
शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील रहावे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे
पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी केले.
ते दौलतनगर ता.पाटण येथे कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब)
यांचे 66 व्या पुण्यतिथी सोहळा व या सोहळयाच्या निमित्ताने आयोजित गरीब कुटुंबातील
विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत
होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील,विजय
पवार,प्रदिप पाटील,मिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील,सुरेश पानस्कर,संजय देशमुख,सुनिल
पानस्कर,मनोज मोहिते,जालंदर पाटील,सोमनाथ खामकर, सुनील पवार यांचेसह लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी कर्मचारी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक
मोठया संख्येने उपस्थिती होते. तत्पुर्वी ना.शंभूराज देसाई यांनी कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांचे प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हंटले की, थोर व्यक्तींचे
योगदान नव्या पिढीला माहिती होण्यासाठी आपण लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव
देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आपण विविध
सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतो.या थोरव्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींच्या कार्याची
माहिती तरुण पिढीला होऊन त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवत विद्यार्थ्यांनी आपली पुढील
वाटचाल केली पाहिजे. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण पाटण तालुक्यातील
गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना इयत्ता 10 वी नंतरच्या पुढील पदवी पर्यंतच्या
शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या उद्देशाने आपण गेल्या 13 वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी
देसाई यांचे नावाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 228 गोर
गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला असून आपल्या उद्योग समुहाकडून
हा छोटासा पण चांगला उपक्रम सुरु केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, लोकनेते
बाळासाहेब देसाई यांना शिक्षणाची मोठी जिद्द होती. आपण शिकलो तरच काही करु शकतो, शिक्षणाशिवाय
पर्याय नसल्याने त्यांनी बोडींगला राहून वकीलीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. लोकनेते
साहेब राजकारणात,समाजकारणात आल्यानंतर त्यांना कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत
खडतर व गरीबीच्या परिस्थितीमध्ये मोलाची साथ दिली, त्यांचा संपूर्ण परिवार सांभाळत
मुलांना चांगले संस्कार देत वाढवलं, कौटुंबिक मोठा आधार देण्याचे काम त्यांनी केले
असल्याने आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतिंना नतमस्तक होणे, त्यांचे विचार पुढे नेणं
खूप गरजेचे आहे.त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल सुरु ठेवली आहे.या थोर व्यक्तींच्या
त्यागातूनच हे वैभव प्राप्त झाले आहे.अशा थोर व्यक्तींचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शिष्यवृत्तीधारक
विद्यार्थीनींनी या शिष्यवृत्तीचा वापर हा शैक्षणिक कामासाठी चांगला वापर करावा.आपल्या
आई वडीलांचे कष्ट डोळयासमोर ठेऊन मोठया जिद्दीने इयत्ता दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण
घ्यावे. चांगले शिक्षण घेऊन स्वता:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असून खऱ्या
अर्थाने या शिष्यवृत्तीचा उद्देश सफल होईल.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील
विद्यालयांनी चांगली यशाची पंरपरा राखली असून या शिक्षण समुहाचा नावलौकीक वाढविण्यासाठी यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षक यांचा मोलाचा हातभार
लागत असल्याचे सांगत पाटण तालुक्यात, सातारा जिल्हयात तसेच महाराष्ट्रभर या थोर व्यक्तींना
साजेस काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.