Thursday, 23 April 2026

दौलतनगर येथे श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाउत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना 43 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण.

 



दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीनदिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळयावर पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

            दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 43 व्या पुण्यतिथीनिमित्त गत सोळा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे सतरावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 743 वाचक सहभागी झाले होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, चि.जयराज देसाई यांचा सहभाग होता. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 43 व्या पुण्यतिथीनिमित्त उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,सोपान टोंपे, तहसिलदार अनंत गुरव,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,गट विकास अधिकारी सरिता पवार, पोलीस उपनिरिक्षक अविनाश कवठेकर, मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक हेमंत काटकर यांनी विनम्र अभिवादन केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह...जयवंतराव शेलार महाराज, ...अनिल पाटील महाराज पापर्डेकर,...जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई पापर्डेकर,शैलेंद्र शेलार,भरत पाटील, सुरेश शिंदे, अमित लोहार,सुभाष देसाई,योगेश जाधव  यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.

            तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी महिला ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली.तसेच सातारा जिल्हा पोलीस दलाचेवतीने मान वंदना देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 43 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत सोळा वर्षापासून ह...पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह...जयवंतराव शेलार महाराज,...अनिल पाटील महाराज,...जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट-रिंगण सोहळा ठरला भाविकांची पर्वणी.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेबयांचे पुण्यतिथी सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचेसह मा.यशराज देसाई (दादा), मा.रविराज देसाई(दादा), यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी एक अद्भुत अशी पर्वणी ठरली.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

Friday, 13 March 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 116 व्या जयंती निमित्ताने मंत्री शंभूराज देसाई यांचेकडून मतदारसंघामध्ये दहा हजार अन्न धान्याचे किटचे वाटप. पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबांना दिला मदतीचा आधार.

 

दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंतीच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तब्बल दहा हजार अन्नधान्याच्या किटचे वितरण पाटण विधानसभा मतदार संघातील गावो-गावी  करण्यात येऊन या विभागातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

   दरम्यान ना.शंभूराज देसाई यांनी केलेली मदत मोलाची  ठरली असून मदत मिळालेल्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.


     लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा जयंती कार्यक्रम प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दौलतनगर ता.पाटण येथे साजरा करण्यात येतो. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे यंदाचे 116 व्या जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दहा हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे गावा गावातील गरीब कुटुंबियांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत केले. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, साखर,डाळ,तेल,मिठ,मिरची पावडर,हळद,चहा पावडर,गरम मसाला,आटा, बिस्किट,कोलगेट इ. वस्तूंचे चांगल्या दर्जाचे साहित्याचा समावेश असून ना.शंभूराज देसाई  यांचेवतीने तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी, काळगाव, कुंभारगाव व सुपने तांबवे या भागामध्ये डोंगर पठारावरील गावांमध्ये  त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुमारे दहा हजार गोर गरीब कुटुंबियांना त्यांचे घरामध्ये जाऊन हे अन्न धान्याचे किटचे जागेवर जाऊन वितरण केले. 

    दरम्यान मंत्री देसाई हे संकट काळी नेहमी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.  अतिवृष्टीमध्ये स्वत: पुराच्या पाण्यामध्ये उतरुन त्यांनी पूरग्रस्त जनतेची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच अतिवृष्टीमध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दळण वळण पूर्ण असतानाही त्यांनी चिखलातून पूराच्या पाण्यातून चालत जाऊन या गावांतील नागरीकांना धीर दिला होता.

    मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे जर काही नुकसान झाले तर प्रथम मदत म्हणून नेहमी ना.शंभूराज देसाई हे मदतील धावून येतात.कोविड सारख्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी हातावरचे पोट असलेल्या मोल मजूरी करणाऱ्या कुटुंबियांना,पानटपरी,वडाप चालक यांना त्याकाळात असेच अन्नधान्याचे किटचे वितरण करुन मोठया प्रमाणांत मदत केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन मंत्री देसाई यांनी तब्बल पाच हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत नुकतेच करण्यात आले. त्यामुळे गोर गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. 


    ना.देसाई हे जरी कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे आपल्या मतदारसंघावर केंद्रीत असते,आजही त्यांची नाळ ही सर्व सामान्य जनतेशी जोडली गेली आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या सुख: दुखाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे विविध गावांमध्ये आपली उपस्थिती लावून त्यांचा आजही मोठा जनसंपर्क असल्याचे पहायला मिळते.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  त्यांनी पालकमंत्री कार्यालय आपले दारी या नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले असून या लाही मोठा प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे.

    नुकतेच त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबियांना धान्याची किटचे वितरण करुन मोठे सहकार्य केल्याने या किटचा लाभ मिळालेल्या कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.


  


चौकट: लोकनेत्यांचे प्रतिबिंब....!


लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी सन 1967 साली पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पत्र्याचे शेड उभारली होती.तसेच पडझड झालेल्या भागांमध्ये पत्र्यांचे वाटप केले होते.लोकनेते साहेबांचे ते ऋण आजही पाटण तालुक्यातील जुनी जाणती मंडळी मोठया मनाने सांगतात.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुध्दा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रमाणे गरीब व गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करत असल्याने ना.शंभूराज देसाई हे त्यांच्या या कार्यातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Tuesday, 10 March 2026

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंती निमित्ताने ना.शंभूराज देसाई यांचेकडून मतदारसंघामध्ये दहा हजार अन्न धान्याचे किटचे वाटप. पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबांना दिला मदतीचा आधार.

 




दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंतीच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तब्बल दहा हजार अन्नधान्याचे किटचे वितरण पाटण विधानसभा मतदार संघातील तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, कोयना, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी,कुंभारगाव व सुपने तांबवे भागामधील गावो-गावी  करण्यात येऊन या विभागातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. ना.शंभूराज देसाई यांनी केलेली मदत मोलाची  ठरली असून मदत मिळालेल्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

           लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा जयंती कार्यक्रम प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दौलतनगर ता.पाटण येथे साजरा करण्यात येतो. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे यंदाचे 116 व्या जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दहा हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे गावा गावातील गरीब कुटुंबियांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत केले. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, साखर,डाळ,तेल,मिठ,मिरची पावडर,हळद,चहा पावडर,गरम मसाला,आटा, बिस्किट,कोलगेट इ. वस्तूंचे चांगल्या दर्जाचे साहित्याचा समावेश असून ना.शंभूराज देसाई  यांचेवतीने तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी, काळगाव, कुंभारगाव व सुपने तांबवे या भागामध्ये डोंगर पठारावरील गावांमध्ये  त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुमारे दहा हजार गोर गरीब कुटुंबियांना त्यांचे घरामध्ये जाऊन हे अन्न धान्याचे किटचे जागेवर जाऊन वितरण केले. ना.शंभूराज देसाई हे संकट काळी नेहमी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.  अतिवृष्टीमध्ये स्वत: पुराच्या पाण्यामध्ये उतरुन त्यांनी पूरग्रस्त जनतेची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच अतिवृष्टीमध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दळण वळण पूर्ण असतानाही त्यांनी चिखलातून पूराच्या पाण्यातून चालत जाऊन या गावांतील नागरीकांना धीर दिला होता.मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे जर काही नुकसान झाले तर प्रथम मदत म्हणून नेहमी ना.शंभूराज देसाई हे मदतील धावून येतात.कोविड सारख्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी हातावरचे पोट असलेल्या मोल मजूरी करणाऱ्या कुटुंबियांना,पानटपरी,वडाप चालक यांना त्याकाळात असेच अन्नधान्याचे किटचे वितरण करुन मोठया प्रमाणांत मदत केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन ना.शंभूराज देसाई यांनी तब्बल पाच हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत नुकतेच करण्यात आले. त्यामुळे गोर गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. ना.देसाई हे जरी कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे आपल्या मतदारसंघावर केंद्रीत असते,आजही त्यांची नाळ ही सर्व सामान्य जनतेशी जोडली गेली आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या सुख: दुखाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे विविध गावांमध्ये आपली उपस्थिती लावून त्यांचा आजही मोठा जनसंपर्क असल्याचे पहायला मिळते.आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून ते आठवडयातून दोन दिवस ते मरळी या ठिकाणी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध असतात.तर गावामध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नुकतेच त्यांनी पालकमंत्री कार्यालय आपले दारी या नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले असून या लाही मोठा प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे.सामान्य जनतेसाठी सतत कार्यरत असलेल्या ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबियांना धान्याची किटचे वितरण करुन मोठे सहकार्य केल्याने या किटचा लाभ मिळालेल्या कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

  

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी सन 1967 साली पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पत्र्याचे शेड उभारली होती.तसेच पडझड झालेल्या भागांमध्ये पत्र्यांचे वाटप केले होते.लोकनेते साहेबांचे ते ऋण आजही पाटण तालुक्यातील जुनी जाणती मंडळी मोठया मनाने सांगतात.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुध्दा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रमाणे गरीब व गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करत असल्याने ना.शंभूराज देसाई हे त्यांच्या या कार्यातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी.

 


दौलतनगर दि.10:- पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांचे कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असल्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले असून मंजूर निधीमधून पाटण विधानसभा मतदार संघातील दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या रस्त्यांचे मजबूतीकरण होणार आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यावरुन मोठया प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरुन वाहन धारकांना दळण वळणाची चांगली सोय होण्यासाठी या रस्त्यांचे मजबुतीचे कामांसाठी  निधीची आवश्यकता  असल्याने ना.शंभूराज देसाई यांचेकडे निधी मंजूर होण्यासाठी या विभागातील नागरीकांना सातत्याने मागणी होती. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव निधी मंजूरीकरीता सादर करण्यात आला होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रा.मा. 148 कि.मी. 13/500 ते  15/00 ची सुधारणा करणे (भाग- कोयनानगर ते गणेश मंदिर हेळवाक) 1 कोटी,नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा 37 कि.मी.34/00 ते 39/200 (भाग- गुजरवाडी ते पाटण) रस्ता रुंदीकरणासह सुधारणा 1.50 कोटी,मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा-133 ची रूंदीकरणासह सुधारणा करणे (भाग-  नवसरवाडी ते मल्हारपेठ) 01 कोटी,लोरेवाडी कोंजवडे भुडकेवाडी कडवे खुर्द केळेवाडी रस्ता प्र.जि.मा.135 कि.मी. 0/00 ते 2/500 ( भाग कोंजवडे फाटा ते कडवे बु. ) मध्ये रुंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 कि.मी. 4/800 ते 6/300 (भाग- बनपेठवाडी ते येराड) मध्ये रूंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 (भाग- कारवट फाटा ते कारवट) मध्ये रूंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 कि.मी. 25/300 ते 27/500 (भाग- बाजे फाटा ते गाढखोप) मध्ये रस्ता सुधारणा 1.50 कोटी,वाघजाईवाडी नाणेगांव जाळगेवाडी चव्हाणवाडी दुसाळे प्रजिमा-37 ते पाबळवाडी फडतरवाडी खडकवाडी जंगलवाडी तारळे रस्ता प्रजिमा-174 कि.मी. 7/800 ते 12/200 (भाग- नाणेगांव फाटा ते जाळगेवाडी) मध्ये रस्ता सुधारणा 01 कोटी,नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा कि. मी. 7/740 ते 10/700 भाग  सासपडे ते कोंजवडे फाटा  रस्ता  सुधारणा 01.50 कोटी,निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी.  0/00 ते 8/500 निसरे ते टेळेवाडी )ची सुधारणा 03 कोटी,नाडे सांगवड मंद्रूळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ ची  रुंदीकरण व  सुधारणा करणे. किमी. १४/७५० ते 20/०० (भाग - दिवशी घाट ते साबळेवाडी) 02 कोटी,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी  रस्ता प्रजिमा 121 (भाग- कि.मी.5/000 ते 12/00  ) सुधारणा 02 कोटी,निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी. 25/00 ते 30/00 मोरेवाडी फाटा ते रामिष्टेवाडी फाटा )  ची सुधारणा 02.50 कोटी,ढेबेवाडी भोसगांव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा-126 कि.मी. 0/000 ते 13/600  (भाग- कि.मी.5/300 ते 9/300  मराठवाडी धरण ते जिंती ) ची सुधारणा 02 कोटी,ढेबेवाडी भोसगांव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा-126 कि.मी. 0/000 ते 13/600  (भाग- कि.मी.9/300 ते 13/600   जिंती ते सातर)  ची सुधारणा 01 कोटी,प्रजिमा 54 ते पवारवाडी मेंढ निवी डाकेवाडी मस्करवाडी लोटलेवाडी काळगाव भरेवाडी  प्रजिमा-162  कि.मी.0/00 ते 20/000 (भाग- कि.मी. 13/000 ते 16/000 मस्करवाडी ते काळगाव )  ची रुंदीकरण सह सुधारणा 01 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/500 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 01 कोटी  या रस्त्यांचा कामांचा समावेश असून या मंजूर कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Tuesday, 23 December 2025

सातारा नागरपालिकेमध्ये शिवसेनेचा प्रवेश..! यशराज देसाई यांचे परफेक्ट नियोजन


जिल्ह्यातील सर्वाधिक महत्वाच्या असणाऱ्या सातारा नगरपालिकेवर भाजप ने आपला निर्विवाद भगवा फडकवला असताना या नगरपालिकेत शिंदे शिवसेने ने धनुष्य बाणाच्या चिन्हावर 'संकेत साठे' हे एक उमेदवार निवडून आणून नगरपालिकेत प्रवेश केला आहे.यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुत्र आणि देसाई कारखान्याचे चेअरमन 'यशराज देसाई' यांची चाणक्यनीती आणि परफेक्ट नियोजन महत्वाचे मानले जात आहे.


  सातारा पालिकेच्या निवडणुकीत  भारतीय जनता पार्टीन घवघवीत यश मिळविले.या निवडणुकीच्या निमित्ताने सातारकरांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप ने  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने तब्बल ४२ हजार ३२ मतांच्या फरकाने विजय मिळवला. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सातारकरांनी  धुव्वा उडवला.


  सातारा नगरपालिका निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखले. मात्र हे यश मिळवताना प्रभाग क्रमांक तीनमध्ये रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांचे मयूर कांबळे आणि जयश्री जाधव या दोन अपक्ष उमेदवारांनी खाते खोलले तर थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रभाग क्रमांक दोनमध्ये संकेत संजय साठे यांचीही एन्ट्री झाली. 

 

    या निडवणुकीत अपक्षानी मारलेली बाजी आणि शिवसेना शिंदे गटाचा चंचू प्रवेश ही पालिका निवडणुकीतील महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे. भारतीय जनता पक्ष,आणि महाविकास आघाडीचे वर्चस्व असणाऱ्या सातारा पालिकेत धनुष्य बाणा ची भले ही 'चंचू एन्ट्री'  ही राजकीय दृष्ष्ट्या विचार करणारी आणि महत्वपूर्ण बाब समजली जात आहे.

    संकेत साठे हे  महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्याचे युवा नेते   लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज  देसाई आणि सदर बाजार प्रभाग दोन मध्ये राहणारे संकेत साठे हे दोघेही क्रिकेट खेळाडू आणि  एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.

 त्यामुळे संकेत साठे यांच्या विजयात  'यशराज देसाई' यांचे  परफेक्ट नियोजन महत्वपूर्ण मानले जाते. 

     दरम्यान 'यशराज देसाई' यांनी क्रिकेट खेळणाऱ्या आपल्या मित्राला थेट साताऱ्याचा नगरसेवक बनवून संकेत साठे यांच्या रूपाने शिवसेनेने साताऱ्यात आपलं खातं उघडलं असल्याची चर्चा साताऱ्याच्या राजकारणात उमटत आहेत.


Wednesday, 17 December 2025

मोरणा गट देसाई गटाचा बालेकिल्ला अभेद्य ठेवा- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आवाहन.

 

                                                                 



दौलतनगर प्रतिनिधी दि. 17: पाटण विधानसभा मतदारसंघातील मोरणा विभागाच्या विकास कामांसाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास निधी देण्यासाठी कुठेही कमी पडलो नाही व यापुढे कमी पडणार नाही. या जिल्हा परिषद गटातील मतदार हा साधा भोळा असून अत्यंत प्रामाणिक असून या विभागातील जनतेने मला पडत्या काळातही मनापासून साथ दिली आहे.मोरणा विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला अभेद्य राहील यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकीत संघटितपणे काम करावे,असे आवाहन राज्याचे पर्यटन खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले .

          पेठशिवापूर (मोरगिरी),ता.पाटण येथे पाटणकर गटातून सुनील मोरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून सुरेश पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला .यानिमित्ताने आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते .यावेळी शंभूराज देसाई यांचे बंधू रविराज देसाई, सुग्रा खोंदू, विष्णू देसाई,डी.वाय.पाटील,नथूराम कुंभार, बशीर खोंदू, किसन गालवे, गणेश भिसे, प्रविण पवार, विजय सुर्वे, शिवाजी कोळेकर, संदिप कोळेकर, विलास मोरे, संपत कोळेकर,किशोर गुरव,नथुराम सावंत,विजय पवार,संतोष गिरी,आनंदा मोहिते,अविनाश नाझरे,शामराव पवार,प्रशांत पवार,मधुकर शिंदे तसेच मोरणा विभागातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .

           यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने पाटण तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर गाजवले. सन 1952 ते 1970 पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार सोबत राज्याचे मंत्री म्हणून त्यानंतर सन 1977 ते 1980 या दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द गाजवली .त्यांच्या अनेक विकास कामांचा महाराष्ट्रभर गौरव झाला. मात्र पाटण विधानसभा मतदारसंघाकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष देऊन लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले .त्यांनी कधी हेवेदाव्याचे गटातटाचे राजकारण केले नाही .सलग चार पिढ्या पाटणच्या जनतेची सेवा करणाऱ्या देसाई घराण्याची लोकसेवेची ही परंपरा आहे .विरोधक त्यांच्या काळामध्ये पाटण तालुक्यात टंचाई असताना केवळ देसाई गटाची गावे म्हणून पाणी देत नव्हते .मात्र आपण कधीही गटातटाचे राजकारण केले नाही.प्रत्येक आठवडयाला होणाऱ्या जनता दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची कामे प्रामाणिकपणे केली जातात.भले त्या व्यक्तीने विरोधात काम करू दे अथवा मला कधी मतदान केलेले नसू दे मात्र त्याचे काम झाल्यानंतरचा वृद्धिंगत होणारा विश्वास हीच खरी जमेची बाजू आहे .जनतेचा विश्वास कमवणे यासाठी पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात. सन 2022 नंतर आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर लोकांनी विश्वास ठेवला आणि खरी शिवसेना ही ना.एकनाथ शिंदे यांचेकडेच राहिली .प्रत्येक वेळेला पक्षाची बाजू विधानसभेत मांडण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली .आज आपण सत्तेत आहोत सातारा जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे . मोरणा भागातील माझा मतदार अत्यंत प्रामाणिक आहे. पडत्या काळातही या मोरणा विभागाने मनापासून साथ दिली आहे .मोरणा भागाच्या विकासासाठी आणि येथे विकास निधी देण्यासाठी मी पालकमंत्री या नात्याने कुठेही कमी पडणार नाही .येत्या महिनाभरामध्ये सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील .या तालुक्यातून जे इच्छुक आहेत त्यांनी आपली राजकीय इच्छा रीतसर आमच्याकडे नोंदवावीत,उमेदवारीबाबत सर्वानुमते निर्णय होईल.यापुढे विजयाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे जे निकष आहेत त्यामध्ये बसणाऱ्या इच्छुकांना संधी दिली जाईल असे सुतोवाच देसाई यांनी केले .मोरणा गट कार्यकर्त्यांनी संघटितपणे मजबूत ठेवावा हा भाग देसाई गटाचा यापूर्वीही बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहील यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करावे उगाच वैयक्तिक हेवेदावे ठेवून एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न करू नयेत असे आवाहन त्यांनी केले . पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी ही योजना राबवणारा 261 पाटण विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव मतदार संघ आहे .पालकमंत्री या नात्याने माझ्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाटण तालुक्यातील 90 गावांमध्ये 4000 लोकांची भेट घेतली .आणि त्यांची लोक आवश्यक कामे 62% पूर्ण केली . पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर आमचे विरोधकही आमच्या योजनांची कॉपी करत आहेत .किती आम्हाला कॉपी कराल ? अमुक अमुक दादा आपल्या दारी अशा घोषणा उठत आहेत हा प्रकार म्हणजे आमच्या योजनेची सरळ सरळ कॉपी आहे असा टोला शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावत जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक आता मतदारांकडे जाऊ लागले आहेत विधानसभा निवडणुका नंतर हे कोठे होते ? असा सवाल शंभूराजे यांनी केला .त्यांच्यावर बोलून मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही असाही टोला त्यांनी लगावला .जो नेता सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करतो त्यालाच जनतेचे प्रेम मिळते पाटण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानूनच काम करावे असे आवाहन त्यांनी केले .सुरेश पाटील व सुनील मोरे व त्यांचे सहकारी यांना पक्षांमध्ये नवे जुने काही वाटणार नाही आपण सर्वजण एकत्रित खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत अशी स्पष्ट ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली .

 

Thursday, 20 November 2025

विकासाच्या मूळपुरुषाचे स्मरण गरजेचे..! स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांचा ८२ वा जयंती सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

 

 


 पाटण तालुक्यात  आमच्या प्रयत्नातून विकासाची गंगा सुरू झाली तरी या विकासासाठी प्रेरणा देणारी मूळ शक्ती,मूळ पुरुष खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांची आहे  म्हणून पाटण तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या विकासाच्या मूळ पुरुषाचे आदर्श विचार  डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पाऊल खुणावर आपली वाटचाल केली पाहिजे.अशी अपेक्षा महाराष्ट्राचे पर्यटन ,खनिकर्म,आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी केले.


ते पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ८२ व्या जयंतीचा सोहळ्यात बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, यशराज देसाई,आदित्यराज देसाई, यांच्यासह शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख मा. जयवंतराव शेलार,माजी चेरमन अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन म्हणून स्व. आबासाहेबांनी केलेले कार्य प्रेरणादायी व आदर्शवत आहे. त्यांनी सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी आणि पाटण तालुक्याच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. पाटणमध्ये साखर कारखान्याची उभारणी ही स्व. आबासाहेबांच्या आणि पाटणवासीयांच्या जीवनातील व तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. स्व. आबासाहेबांनी घालून दिलेले शेतकरीहिताचे धोरण यापुढेही कायम राबवू, हा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आमचे प्रेरणास्थान लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई व स्व. आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही पाटण तालुक्यात काम करीत आहोत आणि यापुढेही करत राहू, हे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले.
    मंत्री देसाई पुढे म्हणाले,स्व आबासाहेबांनी  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली,तालुक्यात विकासाचे वैभव निर्माण करून कारखान्याच्या रूपाने जे रोपटे उभे केले त्याची सर्वस्वी जबाबदारी आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून तत्कालीन कार्यकर्त्यानी स्वतःच्या खांद्यावर घेतली म्हणूनच आज त्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होताना दिसत आहे.
 पाटण मतदारसंघाचा आज जो सर्वांगीण विकास पाहवायास मिळत आहे त्या विकासाचे  संस्थापक कोण? त्याची पायाभरणी कोणी केली? या विकासाला उर्जितावस्था येण्यासाठी कुणाचे योगदान? याचे सदैव स्मरण सर्वसामान्य जनतेला असले पाहिजे.असे स्पष्ट करून पाटण मतदारसंघात जो विकास झालेला आहे त्याचे मूळपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव आहेत या दोन महापुरुषांच्या आदर्श विचारांचे सदैव स्मरण ठेवून भविष्यातील वाटचाल करावी आणि या दोन्ही नेत्यांसाठी हीच खरी आदरांजली ठरेल असा विश्वास ही मंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी व्यक्त केला.

     प्रारंभी ना. शंभूराज देसाई यांनी स्व. आबासाहेबांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. 

    कार्यक्रमात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी प्रास्ताविक केले तर बबनराव शिंदे यांनी आभार व्यक्त केले.